Friday, June 24, 2011

सच्चर समितीचा अहवाल (Sachar Committee Report)


- ओंकार कुलकर्णी                                                    
anpresponse@gmail.com


आत्ताच सच्चर समितीचा अहवाल अर्थात -धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंगहे पुस्तक वाचण्यात आले . अहवाल फारच भयानक आहे, सच्चर समितीच्या सदोष अहवालाने व त्यावर आधारित अंमलबजावणीने धर्मनिरपेक्षतेवर केलेला हल्ला,अफझल गुरूने केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्त गंभीर आहे. 
सच्चर समितीचा अहवाल अर्थात -धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंग .
लेखक :=समीर दरेकर .
७ सद्यसीय सच्चर समिती
प्रमुख राजेंद्र सच्चर
बाकी सदस्य
१] सय्यद हमीद
२] डॉक्टर टी. के. ओमान
३] एम.ए.बसिथ
४] डॉक्टर अख्तर माजीद
५] डॉक्टर अबू सलेह शरीफ
६] डॉक्टर राकेश बसंत
७] डॉक्टर स्येद जाफर महमूद
सच्चर समितीवर जे काम सोपवले होते, ते संक्षेपाने पुढीलप्रमाणे -
१. कोणत्या राज्यात, क्षेत्रात, जिल्ह्यात आणि प्रखंडात मुसलमान मोठ्या संख्येने रहातात ?
२. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे भौगोलिक स्वरूप काय आहे ?
३. इतर सामाजिक-धार्मिक वर्गांच्या तुलनेत त्यांची संपत्ती आणि उत्पन्नाची पातळी कशी आहे ?
४. इतर समुदायांच्या तुलनेत त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाची पातळी कशी आहे ?
५. सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांतील सेवांत त्यांची तुलनात्मक भागीदारी किती प्रमाणात आहे ? अन्य मागास वर्गात मुसलमानांचे प्रमाण किती ?
६. मुसलमान समाजाला शिक्षण, आरोग्यसेवा, महापालिकेच्या सुविधा तसेच सरकारी बँकांकडून मिळणारे कर्ज यांचा पुरेसा वाटा मिळतो का ?
मुस्लिमांना काय?नि हिंदुना काय?सर्वाना समान हक्क हवेत.कोणालाही विशेष हक्क अथवा संधी देण्याची कारण काय? तरीही अल्पसंख्यया गोड नावाखाली मुस्लिमांना केवळ मुस्लीम म्हणून करोडो रुपयांच्या सवलती देणे योग्य नव्हे.त्या सवलती करोडो लोकांच्या खीशातन दिल्या जात आहेत .केवळ त्यांचा धर्म पाहून शिक्षण, रोजगार, सरकारी नोकर्या ,कर्जे फुकट दिली जात आहेत.जे भारतीय राज्य घटनेच्या विरोधी आहे. या शिफारशीमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या पण गृहीत धरण्यात आली आहे .त्यानाही या अहवालानुसार रोजगार मिळणार मग सुशिक्षित हिंदूंचे काय ? याला फक्त एक हिंदू म्हणून किवा एक मुस्लीम म्हणून न बघता एक भारतीय या नात्याने बघितले पाहिजे आणि उद्या हिंदूंसाठी असा कायदा आल्यास त्यालाही असाच विरोध केला पाहिजे
सच्चर समिती हे नाव ऐकले नसेल असा माणूस निराळाच आहे. समिती सदस्य :न्या.राजेंद्र सच्चर सोडून इतर सगळे मुस्लीम.
सच्चर हे नेहमी देशविघातक कारवायांचे समर्थक. नक्षलवादी चळवळीला उघडपणे अनेक्वेळेस पाठींबा. यासीन मलिक या फुटीरवादी नेत्याला उघडपणे पाठींबा स्वतंत्र काश्मीर चे पुरस्कर्ते .व इतर अनेक वादग्रस्त विधानंसाठी प्रसिद्ध .सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी ११७ कोटींची योजना तयार केली आहे. मोफत औद्योगिक प्रशिक्षण, अल्पसंख्याक बहुल भागात निवासी शाळा, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांना प्रोत्साहन भत्ता, अल्पसंख्याक बहुल ४० शहरांचा नागरी विकास अशा योजनांचा यात समावेश आहे.
सच्चर समितीच्या शिफारशींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुस्लिम समाजाच्या मागसलेपणाचा अभ्यास करण्यासाठी महम्मूद रेहमान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला असून त्यात या अकरा कलमी कार्यक्रमांची शिफारस केली आहे. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाने हा कार्यक्रम मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे आणला आहे.
अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारी दूर करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण देण्याची योजना आणली असून ती विद्यापीठे व खासगी कॉलेजना राबवावी लागेल. यावषीर्साठी यावषीर् ४ कोटी ४० लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. दोन हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. एक लाखापेक्षा जास्त वाषिर्क उत्पन्न नसलेल्या कुटुंबातील उमेदवार या योजनेस पात्र असेल.
अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी १६ निवासी शाळा उभारण्यात येणार असून त्यासाठी १९ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. त्याला सलग्न वसतीशाळा उभारण्यात येतील. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांवर दोनशे रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक शाळात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण अधिक असल्याने ते रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना दरदिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे एक रुपया प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असून त्यासाठी २१ कोटी १४ लाख रुपयांची रक्कम खर्च करण्यात येईल.
मुंबई, ठाणे आणि खडकी वगळून ४० अल्पसंख्याक बहुल शहरात पक्की घरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, आदी नागरी सुविधा पुरवण्याची योजना राबवण्यात येणार आहे.
अल्पसंख्याक समाजातील महिलासाठी २५०० बचत गट स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम राखून ठेवण्यात येणार आहे. तसेच या समाजासाठी या योजनांची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येईल.
मदरशांच्या आधुनिकीकारानासाठी मानव संसाधन मंत्रालय तर्फे :
४६९४ मदर्ष्याना १०६ करोड रुपये . दर्जा वाढवण्यासाठी ४९.५० करोड रुपये शिक्षकांच्या वाढीव पगाराचा खर्च सरकार करणार !विज्ञान प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी १ लाख! पुस्तकांसाठी ५०,००० . ग्रंथालयासाठी १०००० ! कोचिंग क्लास साठी ५ करोड ७४ लाख ५९४
आलीगढ विद्यापीठाला बिहार मध्ये १०० एकाकार जागा मोफत ! पश्चिम बंगाल मध्ये १५०एक्कर हायवे जवळ मोफत !(बांगलादेशच्या सीमेलगत म्हणजे मुस्लीम बांगलादेशी घुसखोर आरामशीर घुसणार ) आलीगढ विद्यापीठ आठवते का ?(सिमी च्या अतिरेक्यांना याच परिसरात मारण्यात आले व त्या विद्यापीठाने पोलिसांविरोधात केस चालवली ते. इथे पदव्या विकल्या जातात ! याच विद्यापीठाला केरळ मध्ये ४०० एक्कर जागा मोफत दिली हे सगळे सच्चारांच्या सांगण्यावरून! इस्लाम ला व्याज मान्य नाही म्हणून मुस्लिमांना कर्जे बिनव्याजी.! मुद्दलाची ९५%रक्कम सरकार भरणार !सच्चारा अजब तुझे सरकार! नमोहनसिंग म्हणतात भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे आता ते त्याची अंमलबजावणी करत आहेत सच्चर च्या माध्यमातून.
प्रथम टप्पा ४७ मुस्लीमबहुल जिल्हे वर्ष २००८-०९ :२७०.८५ करोड रुपये .
वर्ष २००९-२०१० :५७५.५०करोड रुपये
एकूण तरतूद :३हजार ७८०रुपये
याकडे सच्चारांचे दुर्लक्ष का?
महाराष्ट्र :मुस्लीम लोकसंख्या :१०.६% तर तुरुंगातील त्यांची संख्या ४०.६%
दिल्ली ::मुस्लीम लोकसंख्या :११.६ % तर तुरुंगातील त्यांची संख्या २९.१ %
विचार करा
मुस्लिमांपेक्षा दलितांचे दारिद्र्यरेषेखालील प्रमाण जास्त आहे .मुस्लिमांचे दर्डोही उत्पन्न 635 आहे तर दलितांचे ५२० आहे . विचार करा

Thursday, June 23, 2011

खरा नास्तिक


- ओंकार कुलकर्णी 
anpresponse@gmail.com


कुठल्याही माणसाला स्वतःला दैववादीम्हणावान्या  पेक्षा प्रयत्नवादीम्हणवले गेलेले जास्त चांगले वाटेलकाही प्रयत्नवादी म्हणवणारे लोक स्वतःला नास्तिक म्हणवतात
नास्तिक म्हणजे देव आहे हे न मानणारा . या ठिकाणी देव म्हणजे अस्तीकाने मांडलेली / केलेली कल्पना
भागतसिंग हि नास्तिक होते .त्यांनी लिहिलेल्या मी नास्तिक का आहेया निबंधाचा संक्षिप्त भाग,“देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी अशी कल्पना आहे कि माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, तृटी यांची झालेली जाणीव विचारात घेवून सर्व परिस्थितीनं धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटाना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालण्यासाठी व त्याच्या वागणुकीवर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा म्हणून दैवी कोप व दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. मनुष्य जेव्हां अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हां आधार द्यायला कुणीतरी आहे व तो सर्व शक्तिमान आहे या .कल्पनेमुळे त्याला आधार मिळतो. व त्याची श्रद्धा ठाम होत जाते……….”शहीद भगतसिंगआस्तिक असणे किंवा नास्तिक असणे हा वैयक्तिक प्रश्न आहे.मुळात माणसाला जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या श्रद्धेची गरज असतेहे म्हणणे अगदी बरोबर आहे . भगतसिंग यांची देशावरची श्रद्धा , आस्तिक नास्तिक असण्यापेक्षा मोठी ठरली.पण मला तरी असे वाटते किखरा नास्तिक कुणी असतो का हो?.कारण असे किती तरी नास्तिक पहिले आहेत जे आपल्या धर्मातील देवांना नाही तेवढे नवे ठेवतील .पण ज्या वेळेस दुसर्या धर्मातील देवतांचा ,त्यांच्या अंधश्रद्धांचा ,परंपरागत चालत आलेल्या चुकीच्या रुढींचा प्रश्न येईल त्यावेळेस ती त्यांची संस्कृती आहे असे काहीतरी गुळगुळीत बोलतात .एका अशा नास्तिकाला मी विचारले असता नास्तिक याचा अर्थ देव न मानणारा . मग तो विश्वाची माझे घर अशी भावना असणारा नसेल कदाचित . आपल्या धर्मातल्या लोकांचे आधी भले व्हावे असे त्याला वाटतअसेलअसे केविलवाणे हास्यास्पद उत्तर मला मिळाले .मग वाटले तो नास्तिक नसून स्वार्थी आहे .केवळ आपल्या बाबत आपल्या धर्माबाबत विचार करणारा आहे .म्हणजे या कारणाने का होईना तो धार्मिकविचारांचा झाला.कारण आत्ताच्या सामाज्सुधाराकांपैकी हमीद दलवाई सोडले तर असे कुठलेच नास्तिक समाजसुधारक नाहीत कि जे आपल्या धर्मातील चुका दाखवण्याबरोबर इतरांच्याही धर्मातील चुका दाखवतील .याविषायाबरइतरांशी चर्चा केली असता काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे माहित नसलेल्या गोष्टी बद्दल जास्त भाष्य न केलेलेच बरे.”.अश्या प्रवृत्तीतून असे होत असावेजसे.कि काही डोक्यापलीकडचे असेल.. ज्याची कार्यकारण मीमांसा कळत नाही ते सगळे देवाच्या…/ अल्लाच्या/ येशू च्यानाहीतर अजून कोणाच्या तरी नावावर खपवायचे…!”पण मला असे वाटते कि ,जर तुमची देवाविषयीची संकल्पना पूर्ण स्पष्ट आहे आणि बुद्धीला पटेल तेच सत्य असे असेल तर माहित नसलेल्या गोष्टी ….”वगैरे कुठे आड येताच नाही .नाहीतर मग त्या तथाकथित नास्तिकांना अशी शंका तर उपस्थित होत नसेल ना कि आपल्या धर्मातील देव खोटा आहे पण दुसर्या धर्मातील देव खरा कि खोटा याविषयी आपल्याला माहित नाही त्यामुळे ना बोललेले बरे म्हणजे दुसर्या धर्मातील देवांबद्दल तुम्ही साशंक आहात ,मग कुठला बुद्धिवाद आणि कुठले नास्तिकत्व ?माझ्यामते जो खरच नास्तिक आहे त्याला देव आहे, देव नाही या गोष्टींवरही चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे समजून विषय सोडून देतात .पण जे मी नास्तिक आहे असे दाखवून देण्यासाठी फक्त त्याच विषयांमध्ये रस घेत बसतात त्यांना फक्त आपण स्वतः कसे बरोबर आहोत आणि इतर कसे चूक एवढेच दाखवून द्यायचे असते .माझ्या मते आस्तिक-नास्तिकत्व वरून भांडणे म्हणजे केवळ बौद्धिक हस्थ्मैथून किंवा सभ्य शब्दात आपली तोंडाची वाफ घालवणे आहे .हे लेख लिहिण्याचा प्रपंच म्हणजे केवळ माझा उद्वेग आहे कारण मी स्वतः आस्तिक नास्तिक अशा कुठल्याही संकल्पनेत बसत नाही कारण कृष्णाने गोवर्धन उचलला ‘,’ब्रम्हाच्या पोटातून कुठलासा राक्षस निघाला ‘,’वगवेगळी व्रते केल्याने इप्सित सिध्द होते ‘, असल्या फालतू कथांना मी उडवून लावतो .पण त्याच वेळी विश्वची निर्मिती करणारी कुठली तरी शक्ती असली पाहिजे असेही मी मानतो .
पण मी आस्तिक नाही देवधर्म मनात नाही” ,असे फक्त स्वतःपुरते न ठेवता,तुम्हीही तसे करा ,असे सांगून इतरांचा फक्त बुद्धीभेद करणे व याचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर करणे मला पटत नाही .